८ सरपंच तर ६१ सदस्य विजयी; ग्रामीण भागात भाजपाची यशस्वी कामगिरी

दक्षिण रत्नागिरीतील चार तालुक्यातील ग्रा. पं. निवडणुकीत जोरदार मुसंडी मारल्याचा भाजपाचा दावा

रत्नागिरी : सचीन पाटोळे

दि. १८  दक्षिण रत्नागिरीमधील रत्नागिरी, राजापूर, लांजा आणि संगमेश्वर या चार तालुक्यात भाजपाने दणदणीत यश मिळवले आहे. ८ ठिकाणी भाजपाचे सरपंच विराजमान झाले असून, एकूण ६१ सदस्य निवडून आले आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीत दक्षिण रत्नागिरीमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. दक्षिण रत्नागिरीतील रत्नागिरी, राजापूर, लांजा आणि संगमेश्वर या चार तालुक्यात भाजपाने चांगले यश प्राप्त करत ग्रामीण भागात भाजपा चांगल्याप्रकारे कार्यरत असल्याचे सिद्ध केले आहे.

राजापूरमध्ये २, लांजा ५ तर संगमेश्वर येथे एका ग्रामपंचायतीवर भाजपाचे सरपंच विराजमान झाले आहेत. तसेच राजापूर येथे १४, रत्नागिरीत ५, लांजामध्ये ३७ तर संगमेश्वरमध्ये भाजपाचे ५ सदस्य निवडून आले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत जोरदार कामगिरी करत भाजपाने चांगले यश मिळवले आहे. निवडून आलेले सर्व सरपंच तसेच सदस्यांचे भाजपा दक्षिण रत्नागिरीचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी अभिनंदन केले आहे.