संजय घोडावत इन्स्टिट्यूट आणि इंपेलेक्स एम्पायर यांच्यात “सामंजस्य करार” संपन्न
या प्रसंगी इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ. विराट गिरी यांनी बौद्धिक संपदा अधिकारांचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, “आयपीआर” मुळे नाविन्यपूर्ण कल्पनांना संरक्षण मिळते. संशोधन, प्रकल्प व स्टार्टअप संस्कृतीला यामुळे चालना मिळते.” या करारामुळे संस्थेतील विद्यार्थी आणि शिक्षकांना नाविन्यपूर्ण संशोधन, प्रकल्प विकास व बौद्धिक संपदा अधिकार विषयक मार्गदर्शन मिळणार असून उद्योग-शिक्षण यामध्ये भक्कम सेतू निर्माण होणार आहे. सत्रात इंपेलेक्स एम्पायरचे तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना पेटंट प्रक्रियेची माहिती दिली तसेच उद्योजकीय क्षेत्रातील संधींवर प्रकाश टाकला.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.