Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.७: नदिवेस येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या वतीने श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नाम, जप, यज्ञ व सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक सोहळा ८ ते १५ एप्रिल २०२६ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात पार पडणार आहे.
बुधवार ८ एप्रिल रोजी ग्रामदेवता मान-सन्मान व मंडळ मांडणीने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. गुरुवार ९ एप्रिल रोजी मंडळ स्थापना, अग्निस्थापना व देवतांचे हवन करण्यात येणार असून सकाळी आरतीनंतर गुरूचरित्र वाचनास प्रारंभ होईल. पुढील दिवसांमध्ये विविध यज्ञांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार १० एप्रिल रोजी श्री गणेश याग व मनोबोध याग, शनिवार ११ एप्रिल रोजी चंडी याग, रविवार १२ एप्रिल रोजी श्री स्वामी याग, सोमवार १३ एप्रिल रोजी गीता याग, तर मंगळवार १४ एप्रिल रोजी रुद्र याग व महारुद्र याग पार पडणार आहेत.
बुधवार १५ एप्रिल रोजी बली पूर्णाहुती, श्री सत्यदत्त पूजन व देवता विसर्जनाने सोहळ्याची सांगता होईल. या संपूर्ण कालावधीत त्रिकाळ आरती, अखंड नामजप सुरू राहणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सेवा केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
Mahalaxmi times is weekly Marathi news paper.mainly working in three Dist.kolhapur,sangli n ratnagiri.along with print media we have face book pages, Instagram,youtube channel,web
news portal . namely news17 .
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.