सांगली बंदची हाक; जाणून घ्या कधी-जिल्ह्यातील प्रत्येक गावात होणार ही गोष्ट
सांगली:प्रतिनिधि
दि:०५: सप्टेंबर: जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर संपूर्ण राज्यभर संतप्त पडसाद उमटले. याच पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाची एक व्यापक बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत येत्या गुरुवारी ७ सप्टेंबर रोजी जिल्हा कडकडीत बंद पाळून प्रत्येक गावात रास्तारोको आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली. या बैठकीस मराठा समाजाचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जालना येथे झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्ज घटनेचा सर्वत्र तीव्र निषेध करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सांगली जिल्ह्यातील विविध गावांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून विविध माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यातील एक व्यापक आंदोलन करण्यात यावे यासाठी आज सांगलीतील मराठा संस्कृतिक भवन येथे मराठा क्रांती मोचाच्यावतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते
या बैठकीस मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक, विविध पक्षाचे संघटनांचे नेते पदाधिकारी आणि मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या सुरवातीला नेत्यांची भाषणे वाढल्याने कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ बाचाबाचीचे प्रकार घडले. यानंतर सर्वानुमते गुरुवारी ७ सप्टेंबर रोजी जिल्हा बंदची हाक देत शहरातील मारुती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून राम मंदिर चौक पर्यंत निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती राज्य समन्वयक डॉ. संजय पाटील यांनी दिली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.