बायकोने किचनमध्ये प्राण सोडले, नवरा भररस्त्यात मृत्युमुखी, मधुमेहाचं औषध जीवावर बेतलं?

कोल्हापुरातील एका जोडप्याला मधुमेहावरील आयुर्वेदिक औषधं खाल्ल्यामुळे प्राण गमवावे लागल्याची शक्यता मुलींकडून व्यक्त केली जात आहे.

कोल्हापूर:प्रतिनिधी

दि:३१:मे:मधुमेहावरील आयुर्वेदिक औषध घेतल्यानंतर काही वेळातच रिॲक्शन येऊन कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील वडणगे येथील एका दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मधुकर दिनकर कदम (वय ५९ ) व जयश्री मधुकर कदम असे पती-पत्नीचे नाव आहे. वडणगे येथील दिंडे कॉलनीमध्ये हे दाम्पत्य वास्तव्यास होते. आयुर्वेदिक औषध घेतल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता मयत जोडप्याच्या मुलींनी वर्तवली आहे.

कोल्हापुरातील एका जोडप्याला आयुर्वेदिक औषधांमुळे प्राण गमवावे लागल्याची भीती व्यक्त केली जात आहे. करवीर तालुक्यातील वडणगे येथील एका दाम्पत्याने मधुमेहावरील आयुर्वेदिक औषध घेतल्यानंतर काही वेळातच रिॲक्शनमुळे त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मधुकर दिनकर कदम (५९) आणि जयश्री मधुकर कदम असे या दाम्पत्याचे नाव असून वडणगे येथील दिंडे कॉलनीमध्ये हे दाम्पत्य वास्तव्यास होते. आयुर्वेदिक औषध घेतल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता त्यांच्या मुलींनी वर्तवली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वडणगे येथील दिंडे कॉलनीत राहणारे कदम दाम्पत्य हे मूळचे शिवाजी पेठेतील आहेत. मधुकर कदम हे एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झाले आहेत. वर्षभरापूर्वी ते आपल्या दोन मुलींसह नवीन घरात राहायला आले होते. वय झाल्याने पती पत्नींना काही दिवसांपासून मधुमेहाचा त्रास सुरू झाला होता

पंधरा दिवसांपूर्वी मधुमेहाचा त्रास वाढल्याने दोघांनीही मुक्त सैनिक वसाहत येथील एका डॉक्टरकडून आयुर्वेदिक औषध घेतले होते. आज सकाळी दोघांनी औषधी पावडर पाण्यात मिसळून घेतली. नंतर मधुकर कदम हे दूध आणण्यासाठी बाहेर गेले आणि त्यांच्या पत्नी स्वयंपाक करत होत्या. दरम्यान काही वेळातच जयश्री यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर काही वेळात त्या बेशुद्ध पडल्या. तर तिकडे दूध आणण्यासाठी गेलेल्या शिवपार्वती चौकातील डेअरीत मधुकर कदमही चक्कर येऊन पडले.यावेळी नागरिकांनी कदम दाम्पत्याला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र खासगी डॉक्टरांनी दोघांनाही सीपीआरमध्ये पाठवण्यास सांगितले. सीपीआरमधील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दोघांचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. या दाम्पत्याला १९ वर्षाची गायत्री कदम आणि १७ वर्षाची विजया कदम या दोन मुली आहेत. आई-वडिलांच्या अचानक मृत्यूमुळे या दोन्ही मुलींना धक्का बसला आहे. तर हे औषध घेतल्यानेच त्यांचा मृत्यू झाला असल्याचा संशय मुलींनी व्यक्त केला आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.