रत्नागिरी जिल्ह्यात ८९ अंगणवाड्या झाल्या स्मार्ट
रत्नागिरी :-मैहरुनिसा साखरकर
इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल कल्याण विभागाने अंगणवाड्यांचे रूप बदलण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले. जिल्ह्यातील ८९ अंगणवाड्यांना स्मार्ट आनंदवाड्या बनल्या आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे जाणारे विद्यार्थी पुन्हा मराठी शाळेत यावेत, यासाठी अंगणवाड्यांची सुधारणा केली जात आहे.
जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाने अंगणवाड्यांचे रूप बदलण्यासाठी कार्यवाही हाती घेतली. त्यावेळी अंगणवाड्यांची नुसतीच रंगरंगोटी करण्याऐवजी मुलांना अंगणवाडीत यावेसे वाटावे आणि पालकांनाही मुलांना पाठवावेसे वाटावे, ही संकल्पना ठेवून अंगणवाड्यांचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे महिला व बालकल्याण विभागामार्फत सांगण्यात आले. याअंतर्गत एलईडी टीव्ही, सोलर लायटिंग सिस्टीम, सॉफ्टवेअर, स्वच्छ भारत किट, वॉटर प्युरिफायर, हँडवॉश बेसीन, एज्युकेशनल पेंटिंग चार्टस आदी साहित्य दिले जात आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.